वनखात्या मार्फत कास्तकाराना नुकसान भरपाई देण्यात यावी.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/05/IMG-20220518-WA0231.jpg)
वनखात्या मार्फत कास्तकाराना नुकसान भरपाई देण्यात यावी !
माहूर ता. (प्रतिनीधी )
नितीन तोडसाम
माहूर तालुक्यातील मतनापूर , हरडप येथील कास्तकारांच्या पिकाची नासाडी परिसरातील वन्य प्राण्या मार्फत झाली आहे. त्याचा मोबदला गेली दहा महिन्या पासुन वन खात्यामार्फत देण्यात आला नाही त्या करीता महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे माहूर तालुका उपाध्यक्ष संजय अन्नमवार ह्यागी लेखी निवेदन वन खात्यास देऊन त्वरीत वाटप करण्याची मागणी केली आहे.
माहूर तालुका हे दऱ्या खोऱ्यात वसलेले असुन वन्य प्राण्याची नेहमिच ह्या परिसत वासव्य असते. व ते आपली तहाण भुक राभवीण्यासाठी गावात परिसातील शेतात मुक्त पणे संचार करीत राहतात व हाती आलेल्या पिकाची लाखो रुपये किमतीचे पिक तुडून फस्त करतात त्यामुळे आर्थीक आडचणी असलेला कास्तकार परत कर्ज बाजारी होतो शासना कडून आपेक्षा ठेऊन झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून वाट पाहात बसतात विन विभागाच्या कुंभ करणी झोपी मुळे कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई १० महिण्या पासुण कास्तकाराना मिळाली नाही .
पावसाळा जवळ येत असल्याने मनसेचे ता.उपाध्यक्ष संजय अन्नमवार ह्यानी वनखा त्याला कुंभ करणी झोपेतुन जागे करुण १० महीण्या पासुन जे कास्तकार नुकसान भरपाई पासुन त्यांना वंचीत राहीले त्यांना नुकसान भरपाई मिळावी लेखी निवेदन देऊन त्वरीत पुरतता करावी अन्यता लोक शाही मार्गाने उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.