वाहुन गेलेल्या महिलेचा मृत्तदेह अखेर 5 दिवसानंतर सापडला

youtube

.वाहुन गेलेल्या महिलेचा मृत्तदेह अखेर 5 दिवसानंतर सापडला

उमरखेड : –
माहेराहून अधिक मास (धोंड्याचा ) पाहुणचार घेऊन पती व मुलींसह मोटारसायकलने हिमायतनगरकडे जात असतांना दि . 23 रोजी दुपारी 2 वाजताचे दरम्यान बोरी ( चातारी ) येथील पैनगंगा पुलावरून दुथडी वाहत असलेल्या नदीत वाहून गेलेल्या महिलेचा मृत्तदेह हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी नदी पात्रात तब्बल 5 दिवसानंतर दि . 27 रोजी 2 वाजताचे दरम्यान छिन्नविछीन अवस्थेत सापडला आहे .
हि माहीती कळताच तालुक्यातील परजना येथील तिचे वडील गोविंदराव सावंत व नातेवाईकांनी डोल्हारी येथे जाऊन नदी पात्रातून प्रेत बाहेर काढले हिमायतनगर पोलीसांनी प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी हिमायतनगर शासकिय रुग्णालय येथे प्रेत नेण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!