स्वांतत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या निंगणुर ते चिंचवाडी गांवाला रस्ता नाही ; आदिवासी ग्रामस्थांचा निवडणुक मतदानावर बहिष्कार राहणार
स्वांतत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गांवाला रस्ता नाही ; आदिवासी ग्रामस्थांचा निवडणुक मतदानावर बहिष्कार राहणार
प्रतिनिधी / २६ सप्टेंबर
उमरखेड –
स्वातंत्र्यप्राप्ती ला सुमारे ७५ वर्ष पुर्ण होत असतांना आदिवासी भागातल्या निंगणूर ग्रा प गट अंतर्गंत असलेल्या चिंचवाडी गांवाला अद्यापही रस्ता नसल्याने वैद्यकीय , शैक्षणिक या मुलभुत सुविधा पासुन दुर असल्याने अख्व गांवच आदिवासी समाजांचे असतांना गांवाला रस्ता च नंसल्याने संपर्कहिन परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषद विभागांकडुन रस्ता मंजुरी मिळाली असे सांगण्यात येते मंजूरी प्राप्त रस्ता आचार संहिता लागण्या पुर्वी करावा अन्यथा होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत कायम गांवकऱ्यांचा बहिष्कार राहिल अशी निर्धारात्मक तटस्थ भुमिका काँग्रेस जेष्ठ नेते माजी आमदार प्रकाश पाटिल देवसकर यांच्या निवास स्थळी घेन्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये चिंचवाडी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे
सन २०११ पासुन चिंचवाडी ग्रामस्थ शासनाकडे रस्ता मागणीचे निवेदने , उपोषण आजपर्यंत सातत्याने करित आले आहेत मात्र वण विभाग किंवा अभयारण्याची कुठलीही अचचण नसतांना या गांवाला वंचित ठेवल्या जात आहे फक्त रस्ते मंजुर झाले म्हणून समज काढण्यात येते मात्र प्रत्यक्षात कामे होत नाही या बद्दल माजी आमदार प्रकाश पाटिल देवसकर यांनी या बाबत शासनाचा निषेध करित खेद व्यक्त केला या गांवाला मुलभुत गरजा पासुन वंचित ठेवले तर लवकरच या प्रश्नी चक्काजाम आंदोलन छेडल्या जाईल असा ईशारा ही गांवातील नागरिक यांच्या समवेत माजी आमदार प्रकाश पाटिल यांनी दिला
या पत्रकार परिषदेला माजी आमदार विजय खडसे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण , चिंचवाडी नागरिक सुरेश खंदारे , पाडुरंग तडसे , हरिदास खंदारे , परमेश्वर भोयाळ , श्रावण खंदारे , मारोती मेंडके , माधव शेळके , मारोती गव्हाळे , राजाराम कपाटे , पाडुरंग टारपे , उत्तम हाडे , नामदेव टारपे यांच्या सह गांव नागरिक उपस्थित होते या आशयाचे निवेदन सुद्धा उप विभागिय अधिकारी , तहसिलदार व संबधित जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात आले
तटस्थ ग्रामस्थ पक्षाचे नेते यांचा निर्धार फोटो



