सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला भाजपा विधानसभा उमेदवारी देईन का.?

youtube

सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला भाजपा विधानसभा उमेदवारी देईन का.?

उमरखेड
उमरखेड विधानसभेची सिट ही राखीव एस सी साठी असुन आतापर्यंत भाजपा पक्षाने रीपीटी उमेदवार दीला नाही.दरवेळेस पक्ष नवनवीन चेहर्‍यांना संधी देतो. अशातच
उमरखे मतदारसंघात आपल्या विविध सामाजिक कार्यामुळे सर्वदुर प्रसिध्द असणारे समाजसेवक शेवंतराव गायकवाड हे भाजपाकडे विधानसभेची ऊमेदवारी मागत आहेत. त्याचबरोबर अनेकजण भाजपाच्या ऊमेदवारी करीता ईच्छूक असल्याचे दीसत आहे.त्यामध्ये शेवंतराव गायकवाड हे,गेल्या अनेक वर्षापासुन बचत गटाच्यामाध्यमातुन हजारो महीलांना विविध बँकेच्या माध्यमातुन कर्जपुरवठा करुन व्यावसाय ऊभारणी करीता मदत करीत आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या एनजीओ च्या ऊपक्रमामुळे मोठी ओळख निर्माण होऊन त्यांचा मोठा जणसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांच्या सेंद्रीय शेती ऊपक्रमातुन ते शेकडो गरीब,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाचे कार्य सतत करीत असल्याने शैतकरीवर्गातही त्यांच्याबद्दल आपुलकी असुन त्यांचाही चांगला पाठींबा पहायाला मिळते.
उमरखेड व महागाव तालुक्यातील वनक्षेञप्राप्त 83 गावांना सामूहीक वनहक्काच्या जमीनी मिळून देऊन त्यावर त्या लोकांना रोजगार ऊपलब्ध करुन देण्यासाठी करोडो रुपयाचे “गाव तीथे कृतीआराखडा” तयार करुन दीलेत. त्यामुळे समाजातील आदीवासी लोकांसाठी मोठी संधी ऊपलब्ध करुन देत असल्याने शेवंतराव गायकवाड हे सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी लढणारा हाडाचा कार्यकर्ता आहे. “कोरोणा संकट काळात,”त्यांच्या एक पोळी जास्तीची” ,या सामाजीक ऊपक्रमातुन हजारो ऊपाशी,बेघर,मनोरुग्ण,वाटसरु लोकांना लोकसहभागातुन अन्नदान करुन या’औदुंबरनगरीचे नाव सातसमुद्रपार”, नेण्याचे कार्य केले. शेकडो बेरोजगार,महीला व पुरुषांना त्यांना रोजगार ऊपलब्ध करुन दील्याने ते “तरुणांच्या गळ्यातील ताईत”,ठरतात.
रस्त्याने फीरणारे,बेङर,मनोरुग्नंना आंघोळ,कटींगदाढी,भोजन देऊन सेवा करतात,एवढेच नाही तर त्यांचा ऊपचारही करतात.त्यामुळे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन होतांना दीसते. मग असा व्यक्ती जो सतत समाजवेत मग्ण असतो, तो जर”भाजपा पक्षाला जनहीतासाठी विधानसभा उमरखेडमधुन ऊमेदवारी मागत आहे त्याला भाजपा संधी देईन का,? त्यांच्या समाजकार्याची दखल घेईन का? हा येणारा काळच सांगेन.
शेवंतराव गायकवाड हे सर्वसामान्य कुटुंबातुन असुन तळागाळातील लोकांसाठी काम करणारे आहेत.त्यांचेकडे “व्हिजन” आहे,त्यामुळे त्यांना ऊमेदवारी मिळाली तरच उमरखेडचा विकास होईन असे त्यांचे मिञपरीवारांना विश्वास आहे.
सद्यातरी भाजपाकडे असा स्वच्छ व निष्कलंक दुसरा चेहरा नाही.!

Google Ad
Google Ad

3 thoughts on “सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला भाजपा विधानसभा उमेदवारी देईन का.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!