अभियांतानी नवनवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे – जिल्हा अधिकारी अमोल यडगे.

youtube

 

अभियांतानी नवनवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

उमरखेड –

संजोग भवन येथे औदुंबर बांधकाम साहित्य प्रदर्शनी व ग्रहकर्ज मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सर्व अभियंता यांनी आयोजित केला होता. तसेच जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले व त्यांनी सर्व विविध प्रकारच्या स्टॉलला भेटी दिल्या तसेच त्यांनी असे म्हटले की जिल्हाधिकारी यांनी बांधकाम क्षेत्रात नवनवीन या तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे. सर्वात जास्त प्रगतीचे शेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पहावयास मिळते जास्तीत जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधिकारी अमोल ऐडगे यांनी उप अभियंता शी बोलताना
रुजण्यासाठी काही वर्ष लागतील परंतु शासनात हेतू या सर्व गोष्टींमध्ये जिथे जिथे परवानगीचा विषय येत होता किंवा जिथे जिथे किचकटपणा येत होता तो कमी करण्याचा आहे. आपण सर्वांनी सुधारणा बाबतही आपण वाचला असेल की या अगोदर अपुरुषक परवानगी घेण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती कुठे कलेक्टर ऑफिसमध्ये काही गटांसाठी जावं लागत होतं काही गटांसाठी ऍडिशनल कनेक्ट करून जावं लागत होतं काय गटांसाठी काय गटांसाठी तहसीलदारांकडे पण आता जे 42 ब 42 ब मध्ये जे गट येतात म्हणजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे त्या ठिकाणी रिजनल प्लांट झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या त्या झोनमध्ये ते क्षेत्र ते गट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला अकर्षक परवानगीसाठी कलेक्टर ऑफिसला यायची गरज नाही. तो ॲडिशनल कलेक्टर किंवा एचडीएम यांच्याकडे येण्याची गरज नाही. आपलं जर क्षेत्र त्या गटामध्ये येत असेल तर डायरेक्टली तहसीलदारांकडे डिमांड करून आपण सहज मिळवू शकता. त्यानंतर टाऊन प्लॅनिंग करून प्लॅन मंजूर करून आपण पुढचं काम करू शकता मी यासाठी सांगितलं की शासनाचा धोरण सर्व क्षेत्राला बांधकाम क्षेत्र असेल किंवा सर्व उद्योग असतील त्यांच्या कमीत कमी वेळ परवानगी मध्ये जावा यासाठी शासनाचा धोरण आहे. आणि त्याची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने केला जाईल त्याचा मी प्रशासन काळजी घे त्यासोबतच वेगवेगळी काम जे पूर्ण जिल्हाभरामध्ये उमरखेड मध्ये जे अभियंतांकडून केले जात आहेत हे सुद्धा स्तुतिपात्र आहेत आणि यापुढेही चांगलीच चांगली आपण करावे जसं आता अधीक्षक अभियंतांनी सांगितलं. की पहिल्यांदा जो काही टाईप प्लॅन असायचा अनुसार आपण इमारती करायचो पण त्याच्या पुढे जाऊन आता जिल्ह्यामध्ये नियोजन भावनाची इमारत असेल कृषी भवन असेल किंवा इतर काही इमारती असतील आपण अगोदर त्याचा आर्किटेक करून प्लॅन घेतोय इमारत असेल तर ती चांगल्यात चांगली इमारत बरीच वर्षे राहणार आहे. कोणत्याही टाइप लाईन मध्ये न राहता एक चांगले चांगले सुंदर इमारत बनावी जशी गरज आहे. त्या कार्यालयाची तशी इमारत असावी असे प्रयत्न आपण करतोय मागील काला मधले जर काही बांधकाम आपण बघितले काही इमारती बघितल्या काही मुलांची काम बघितले तर अजूनही ते टिकणारे अशी काम आपल्या अगोदरच्या अभियंताने करून ठेवलेले आहेत. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे शासकीय इमारती असतील किंवा कुठे आपण खाजगी इमारती किंवा खाजगी प्रोजेक्ट करतोय त्या ठिकाणीही चांगल्यात चांगली कॉलिटी आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल सौंदर्य त्या ठिकाणी इमारतीमध्ये राहील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ही माझी सूचना आपल्या अभियंता संघटनेला राहील. परत शेवटी आज मी उमरखेड मध्ये या कार्यक्रमासाठी सुद्धा आलेलो आहे एक फर्निचर चे चांगले क्लस्टर आपल्या यवतमाळ उमरखेड शहरांमध्ये बनत आहे. त्या क्लस्टर ला सुद्धा एमआयडीसीमध्ये मी भेट देणार आहे आणि आज आपण गृह कर्ज मार्गदर्शन सुद्धा एक चांगला विषय दुर्लक्षित राहतो. तोही विषय आपण ठेवलेला आहे तर उमरखेड शहराची एक चांगलं उद्योगासाठी प्रिय असणारे शहर अनेक चांगला उद्योग वाढणारे शहरी एक आपल्याला ओळख निर्माण करायचे आणि त्याची मला वाटते आपण सर्वांनी मिळून सुरुवात केलेली आहे. जर लोकेशन वाई जर आपलं शहर बघितलं तर शहर आपण मराठवाडा विदर्भाचं मार्केट कॅप्चर करू शकतो असा आपल्या शहर आहे फर्निचर साहित्यामध्ये असेल किंवा बांधकाम साहित्यामध्ये असेल किंवा जे अभियंता इथे काम करत आहेत ते सुद्धा फक्त उमरखेडच टार्गेट न ठेवता उमरखेडच्या आजूबाजूची शहर किंवा इवन मुंबई पुण्यामध्ये सुद्धा तिथे खूप पोटेन्शिअल आहे तिथे सुद्धा आपण आपलं जे कर्तृत्व आहे किंवा जे स्किल आहे ते आपण दाखवू शकतो. तर ती एक विनंती माझी सर्व अभियंता संघटनेला राहील मी सुद्धा येथे इंजिनियरच आहे. सीओईपी मधून योगायोगाने डॉक्टर विश्वेश्वरय्या भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या त्यांच्या शिक्षण या ठिकाणी झालेल्या तिथेच मला शिक्षण घेता आलं त्यामुळे इंजिनियर जे काय आपण म्हणतो “देशाची लाईफ लाईन रोड आहे नवीन नवीन बिल्डिंग आहेत तर ते बनवण्याचं काम इंजिनियर करतात” तर हेच काम आपण या पद्धतीने पुढे ठेवावं आपल्या कामातून उमरखेड शहरांमधील जास्तीत जास्त नवयुगांना इंजिनियर बनण्याचं जे काय आहे ते स्वप्न किंवा जे उद्दिष्ट आपण त्यांच्यासमोर ठेवावं आणि चांगले चांगले इंजिनियर उमरखेड मध्ये घडवून पूर्ण देशभरामध्ये आपलं नावलौकिक घडवतील अशा पद्धतीने आपण काम करावं ही एक माझी शुभेच्छा पर सूचना आपल्या सर्वांना राहील आणि परत एकदा एक चांगला कार्यक्रम घेतला सर्व अभियंता चे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला
उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल येडगे तसेच प्रमुख उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना मॅडम, अधीक्षक अभियंता सा. बा . वि . दिपक सोनटक्के , स . संचालक नगर रचना कीरण राऊत , उपविभागीय अधिकारी डॉ . व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या साहित्य प्रदर्शनी कार्यक्रमात प्रदर्शनीमध्ये नागरिकांना सिमेंट, स्टील, स्टाईल, फिटिंग, प्लंबिंग ,सेलिब्रेशन, कलर्स व इंटिरियर फर्निचर साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते तसेच कार्यक्रमात दीपक सोनटक्के यांनी सर्वांना मार्गदर्शन करत .नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कशाप्रकारे करा केला पाहिजे पावसाळ्यातही “जेट प्याचेम” सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात सुद्धा ही डांबरीकरण करता येऊ शकते असे सांगण्यात आले .या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बांधकाम साहित्य प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले व प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली व मार्गदर्शन करत सांगण्यात आले .
तालुक्यातील अभियंता संघटनेने एकत्रित येऊन नावलौकिक केल्याने बांधकाम क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे . . . जिल्ह्यातून बांधकाम क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनी लाभला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अभियंता सुरेंद्र कोडगीरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष अभियंता सतीश पत्रे यांनी केले . यावेळी तालुका अभियंता उपाध्यक्ष राऊ नाईक पंडागळे यांनी Valuation of real estate या विषयात पदवी उत्तर पदवी प्राप्त केल्या बद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते राऊ नाईक यांना सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भूषणअग्रवाल, व्यंकटेश निलावार ,वैभव कोसलगे, अभिषेक सुरते ,अश्विन कन्नावार ,धनंजय गावंडे, स्वराज देवसरकर, चेतन काळबांडे ,राजेश दिघेवार, निलेश हेलगंड, मिथिलेश जयस्वाल ,सुधाकर काळबांडे, विनायक मुधोळ, सावन, पाईकराव ,मनोज शिरडकर, भूषण तेला अदी अभियंत्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला..

Google Ad
Google Ad

2 thoughts on “अभियांतानी नवनवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात केला पाहिजे – जिल्हा अधिकारी अमोल यडगे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!