सरपंचानी गांवकरी, कर्मचारी यांना एकत्र करून गांवाच्या विकास साधावा -चिता़ंगराव कदम मा. सदस्य जि.प.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221101-WA0407-1024x473.jpg)
सरपंचानी गांवकरी, कर्मचारी यांना एकत्र करून गांवाच्या विकास साधावा -चिता़ंगराव कदम मा. सदस्य जि. प. यवतमाळ
उमरखेड ..
आज दि.०१-११-२०२२रोजी स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथील राजीव गांधी भवन येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत मुळावा जि. प. गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलिस पाटील,आशा सेविका, रोजगार सेवक, ग्रामपंचायत ऑपरेटर, पटवारी, आरोग्य परिचारिका यांची कार्यशाळा घेण्यात आली.प्रथमता स्वच्छतेचे पुजारी, कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुष्पहार व पुष्प वाहुन पुजन केले.या कार्यशाळेचे अध्यक्ष चितांगराव कदम सर, प्रशिक्षक म्हणून श्री.शरद वानखेडे पुसद,मधुकर मुंढे वि. अ. पंचायत, रामरावजी जामकर मा. पं. स. सदस्य, सुदर्शन ठाकरे सरपंच कुपटी,रामा ठेंगे सरपंच नागापूर,बंडु ढाकरे सरपंच पिंपळदरी, ललिता जामकर सरपंच मुळावा, कौशल्या चंद्रवंशी सरपंच सुकळी (न.) मारोतराव कदम, बंडु चिंचोलकर, मारोतराव कदम पोलिस पाटील नागापूर, प्रकाश शिंदे मुख्याध्यापक नागापूर, लोणे मॅडम A. N. M., माखणे पटवारी, पाटील, काकडे, जाधव, शहा, गोरे,अडागळे,कोंडावार ग्रामसेवक, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस हजर होत्या गावातील बापुराव कुरमे, रावसाहेब कदम, गणेशराव चंद्रवंशी, भिमराव जाधव,प्रताप आडे रोजगारसेवक, संदेश हनवते, मारोती ठेंगे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनय चव्हाण सर यांनी केले.