महाराष्ट्र बंद उमरखेड येथे मोटारसायकल रँली काढून महाविकास आघाडी कडून चांगला प्रतिसाद.

महाराष्ट्र बंद मोटारसायकल रॅली महाविकासआघाडी तर्फे चांगला प्रतिसाद.
काही व्यापाऱ्यांचा बंदला विरोध.
उमरखेड..
उत्तर प्रदेशातील लखीनपूर खेरी येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मूलाने शेतकर्याच्या अंगावर गाडी घालून अमानूष हत्याकांड करणे,कृषी कायद्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकर्यांची बाजू ऐकून न घेता त्यांचा आवाज दडपला जात असून कामगार विरोधी कायदे,बेछूट खासगीकरण आणि महागाईचा आगडोंब अशा गर्तेत देशाची जनता सापडली असून केंद्र सरकारच्या या अत्याचारा विरोधात महाविकास आघाडी मधिल विविध पक्षांनी दि, 11 ऑक्टोबर रोजी “महाराष्ट्ट बंद” चे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रँली काढण्यात आली . आंदोलनकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून(1)शेतकर्यांना देशोधडीला लावणारे कृषी कायदे (2)कामगारांना उद् ध्वस्त करणारे कायदे(3)लखमपूर येथे शेतकर्याचे
अमानूष अत्याकांड,पेट्रोल-डिझल
गॅस इंधन दरवाढीसह वाढती महागाई,सरकारी-निमसरकारी उद्योगधंद्याचे खाजगी करण अशा विविध धोरणाच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने निर्दशने देवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे नंदकिशोर अग्रवाल, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,रामभाऊ देवसरकर जि. प.बांधकाम सभापती, शिवसेनेचे- चिंतगराव कदम,ॲड मुटकुळे, राष्ट्रवादीचे- राजू भाऊ जयस्वाल, सतीश नाईक ,राजेश कवाने,संदिप ठाकरे , प्रेम हनवते, प्रहारचे सय्यद सय्यद पाशा, प्रहार कारकरते ,शेतकरी संघटना,स्वाभिमानी शेतकरी संघटना,व सर्व काही मोजक्या व्यापारी बांधवानी आपली दुकाने बंद करून पांठिबा नोंदवाल.पोलिसाचा चोख बंदोबस्त मध्ये आंदोलन पार पडले.



