मला भाषणा पैक्षा विकासाची कामे महत्वाचे व राजकारणात शब्द पाळणे महत्वाचे – महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर
मला भाषणा पैक्षा विकासाची कामे महत्वाचे व राजकारणात शब्द पाळणे महत्वाचे
– महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर
उमरखेड –
७ एप्रिल मागीत९ वर्षांत देशाबा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रायनिक प्रपान केले. शेवटच्या घटकापर्यंत विकास्गंगा पोहोचवून देशाला समृद्ध करण्यासाठी मोदीचे हात बळकट करायाचे असे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांनीनी केले. तसेच भाषण न करता मी समाजाच्या विकस कसा होईल हे महत्वाचे आहे. रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाने होते.
यावेळी शिवसेनेचे रविकांत रुडे, कपिल चव्हाण, रमेश आडे भाजपा तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते, अॅड. आदित्य माने, धरमानंद कदम, बळवंत नाईक, अॅड. राजेश्वर रायेवार दत्तदिगंबर वानखेडे, रोहित वर्मा, राकाँचे शंकर तांलनकर, यांच्यासह महायुती घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक चितांग कदम
बाबुराव कदम बोलताना, सोबत इतर मान्यवर
यांनी केले. तर महेश काळेश्वर, बबलू जाधव, सिद्धार्थ बरडे, डॉ. आरती फुपाटे, यांनी मार्गदर्शन केले. शिवेसेनेच्या एक पाऊल पुढे
जाऊन भाजपा कार्यकर्ता काम करेल असे अभिवचन नितीन भुतडा यांनी यावेळी दिले. तर माजी आमदार उत्तम इंगळे
हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत ६ विधानसभांतून उमरखेड विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य महायुतीला दिले होती. त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन यावेळी निवडून आणु.
अध्यक्षीय भाषणातून आ. नामदेव ससाने म्हणाले, मागील लोकसभेत भाजपा आणि शिवसेना पारंपरिक युती असलेल्या पक्षाला जनतेने बहुमत दिले.मात्र मध्यतरी उद्धव ठाकरे यांनी विचित्र युती केली.
भाजपासोबत काडीमोड घेतला. मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून देश विकासाच्या वाटेवर आहे. देश समृद्धी साठी मोदीचे हात बळकट करायचे असे आव्हाण बाबुराव कदम यांनी केली.
अमेरिकेसारखे रस्ते आपल्या देशात झाले.
२०१४ पूर्वी देशात केवळ ३७० मेडिकल कॉलेज होते, आज 670 आहेत. केवळ एक एम्स येते. आज १६ आहेत. ही किमया मोदी सरकारची आहे. २००१४ नंतर कुठेही दहशतवादी करवाया, बॉम्बहल्ला झालेला नाही, याकडे डॉ. देवसरकर यांनी लक्ष वेधले.



