जलतारा’ प्रकल्प गावागावात ; महा’जनशक्ती’ देणार साथ – संस्थापक गजानन जोशी 【गावागावात ‘जलतारा’ – दुष्काळाचा करू निपटारा

youtube

जलतारा’ प्रकल्प गावागावात ; महा’जनशक्ती’ देणार साथ – संस्थापक गजानन जोशी

【गावागावात ‘जलतारा’ – दुष्काळाचा करू निपटारा!】

नांदेड –

महाराष्ट्र राज्यात शासनाच्यावतीने दुष्काळमुक्तीसाठी विविध प्रकारे योजना राबविल्या गेल्या परन्तु दुष्काळ काही मुक्त झाला नाही. यादरम्यान मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले जलनायक डॉ.पुरुषोत्तम वायाळ यांनी ‘जलतारा’ प्रकल्पाची सुरुवात केली आणि पहिल्या टप्यात २०० गावे पाणीदार झाली हा स्तुत्य उपक्रम त्यांनी शासनाच्यादारी मांडला आणि या उपक्रमाला शासकीय योजनेत आणले गेले. आता ही योजनेची योग्यदृष्टीने अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय समिती केलेली आहे. जिल्ह्याजिल्ह्यात कार्यशाळा आयोजन केले जाते.

यात सरपंच-ग्रामविकास अधिकारी-ग्रामसेवक यांसह विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षित केले जाते. यानंतर होतो जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ आणि प्रकल्पाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर १००% पाणीपातळीत वाढ होताना दिसून येते आहे. या जलतारा प्रकल्पाला शासकीय योजनेत समाविष्ट केल्यामुळे आर्थिक भार कोणत्याही शेतकऱ्यांवर पडणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. महाराष्ट्र राज्यभर ‘जलतारा’ प्रकल्प गावागावात राबविण्यासाठी महा’जनशक्ती’ परिषद सामाजिक कार्यासाठी भक्कम साथ सज्ज असणार आहे…

— चौकट —-

पंचायतराज विकास मंच व
अखिल भारतीय सरपंच परिषद,महाराष्ट्र यांच्या सहयोगाने पुढील १ महिन्यात सरपंचांसाठी राज्यस्तरीय ‘जलतारा’ प्रकल्पाची विशेष कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!