बांगलादेशात हिंदू वर होत असलेला अन्याय थांबवा ; सकल हिंदू समाज च्या वतीने पंतप्रधान मोदींना साकडे
बांगलादेशात हिंदू वर होत असलेला अन्याय थांबवा ;
सकल हिंदू समाज च्या वतीने पंतप्रधान मोदींना साकडे
प्रतिनिधी / १९ डिसेंबर
उमरखेड –
बांगला देशातील माथेफिरु मुस्लिम समाजाकडून हिंदूसमाजातील बांधव भगिनी तसेच गोमाता वर अन्याय अत्याचार होत असून हिंदू देवी देवतांची विटंबना होत आहे त्यामुळे भारतातील हिंदू समाज व्यथीत झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून मत मांडून हिंदू वरील अन्याय थांबवावा तसेच हिंदूंना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी या आशयाचे निवेदन उमरखेड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत पाठवण्यात आले आहे .
बांगलादेश पूर्वी भारताचा भाग असल्याने तिथे हिंदू राहतात त्यांचेवर माथेफिरू मुस्लिम समाजाकडून दररोज अन्याय होत आहे महिलांवर अन्याय अत्याचार होत असून गोमातेवर सुद्धा अन्याय करत असल्याच्या चित्रफिती प्रसारित होत आहे देवी देवतांची सुद्धा विटंबना होत आहे त्यामुळे भारतातील हिंदू समाज अत्यंत दुःखी आहे
याउलट बांगलादेशातील घुसखोर मात्र भारतात सर्व सुविधा घेऊन कर्नाटक राज्यात राहत असताना राष्ट्रध्वजाचा नेहमी अवमान करतात तरी हिंदू समाज भारतातील बांगलादेशांवर कधी अन्याय करत नाही परंतु बांगलादेशात अत्याचाराची परिशिमा गाठली असून हिंदू वरील अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून मत मांडून हिंदू वरील अन्याय थांबवावा व स्वतंत्र व्यवस्था हिंदूंची करण्यात यावी अशा आशयाची निवेदन सकल हिंदू समाज उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे
यावेळी ॲड संजय जाधव , माजी आमदार नामदेव ससाने , भाजपा समन्वयक नितीन भुतडा , संदीप ठाकरे ,रविकांत रुडे , अमोल सूर्यवंशी ,शिवा कलोसे , सुनील शहाणे ,विशाल गिरी ,अनंतराज दास अमृते,बसवेश्वर क्षीरसागर ,रमेश चव्हाण ,दामोदर इंगोले , कैलास कदम सह सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता .
सोबत –
फोटो जोडला



