उमरखेड तालुक्यात अतीवृष्टीमुळे पूरस्थिती आमदार किसन वानखेडे यांची तत्पर पाहणी, नागरिकांना दिलासा उमरखेड :

youtube

उमरखेड तालुक्यात अतीवृष्टीमुळे पूरस्थिती

आमदार किसन वानखेडे यांची तत्पर पाहणी, नागरिकांना दिलासा

उमरखेड :
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतीवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विडूळ गावात पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले. दराटी येथे तब्बल २०० घरांमध्ये पाणी शिरले असून, ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनासह घटनास्थळी भेट देऊन पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिकांची विचारपूस करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

या वेळी आमदार वानखेडे यांनी प्रशासनाला पूरग्रस्तांसाठी तातडीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या तातडीच्या उपाययोजना करण्यास सांगितले. “या संकटकाळात शासन व मी स्वतः नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणालाही दिलासा मिळण्यात कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.

पावसाचे प्रमाण :
१५ ऑगस्ट रोजी चातारी, ढाणकी व निंगनूर या मंडळांत ७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर मंडळांत सरासरी ६५ मि.मी. पाऊस पडला. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली आहे. गावागावांत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!