उमरखेड तालुक्यातील ग्राहकांचा संताप उफाळला जिओ विरोधात तीव्र नाराजी
उमरखेड तालुक्यातील ग्राहकांचा संताप उफाळला
उमरखेड
उमरखेड तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून रिलायन्स जिओ चे नेटवर्क पूर्णपणे खोळंबल्याने हजारो ग्राहक अक्षरश हैराण झाले आहेत. कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा ठप्प आहे, ऑनलाइन व्यवहार अडकले आहेत आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक कामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उमरखेड तालुक्यातील. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क ही केवळ सुविधा नसून दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. शेतकरी ऑनलाइन नोंदी, बँक व्यवहार आणि बाजारभाव पाहण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग बंद पडले आहेत. व्यापाऱ्यांचे व्यवहार अडकले आहेत. अशा परिस्थितीत सलग सहा दिवस सेवा बंद राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
नेटवर्कच्या समस्येमुळे अनेक ग्राहकांनी
बी एस एन एल वोडाफोन आयडिया आयडिया आणि एरटेल कडे धाव घेतली आहे. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सेवा नाही तर ग्राहक नाही असा स्पष्ट इशारा नागरिक देत आहेत.
ग्राहकांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही. कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा वेळेत दुरुस्तीबाबत स्पष्ट माहिती न दिल्यामुळे नाराजी आणखी वाढली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून नेटवर्क सेवा सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत, व जेवढे दिवस जियो सुविधा बंद होती तेवढे दिवस ते दिवस नेट पँक मध्ये वाढवून दयावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचा एकच प्रश्न आहे सेवा देऊ शकत नसाल, तर ग्राहकांकडून शुल्क का आकारता? आता कंपनीने तातडीने नेटवर्क सुरळीत करून ग्राहकांचा विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा ग्राहक कायमचे इतर कंपन्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.



