उमरखेड तालुक्यात स्वखर्चातून सिंचन विहिरी बांधल्या १२ कोटी २५ लाख ८३ हजार प्रलंबित शेतकरी अडचणीत, लाभार्थी च्या पंचायत समितीला येरझारा उमरखेड :-

youtube

उमरखेड तालुक्यात स्वखर्चातून सिंचन विहिरी बांधल्या

१२ कोटी २५ लाख ८३ हजार प्रलंबित

शेतकरी अडचणीत,
लाभार्थी च्या पंचायत समितीला येरझारा

उमरखेड :-
नरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना सिचंन विहिरी मंजूर झाल्या. सरकारी पैसा मिळणारच, या अपेक्षेने बांधूनही टाकल्या. यात एकुन ९६० कामाचे सुमारे १२ कोटी २५ लाख ८3 हजार ६६१ रुपये प्रलंबित आहेत मात्र, निधीसाठी लाभार्थ्यांना उमरखेड पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. या प्रकारात संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. दैनंदिन खर्च भागविताना त्यांना मोठी कसरत करावी लागते.
शेतात विहीर करून बारमाही पिके घेऊन आर्थिक उन्नती साधण्याच्या हेतून तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. शासनाने सुरू केलेल्या नरेगा योजनेतून ६०६ शेतकऱ्यांना सिंचन विहीर गुराचे गोठा २८६ मोहगणी वृक्ष लागवड 3४ शोषखड्डा २० व इतर कामे असे ९६० कामे पुर्ण झाली आहे. मात्र, शासनाचे पैसे मिळेपर्यंत काम अर्धवट ठेवता येत नाहीत. काम पूर्ण करून बिल ऑनलाइन करावे लागते. नंतरच रक्कम मिळते.

प्रत्येक वेळी आश्वासन देऊन परत पाठवितात

विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी उधार-उसनवार करून, सोने गहाण ठेवून, कर्ज काढून विहिरीचे बांधकाम केले. पैसा मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली प्रक्रियाही पूर्ण केले. मात्र, ३० सप्टेंबर २०२४ पासून रक्कम प्रलंबित आहे. ही रक्कम केव्हा येणार, यासाठी शेतकरी पंचायत समिती कार्यालयात येरझारा मारत आहे. प्रत्येक वेळी त्यांना आश्वासन देऊन परत पाठविले जात आहे.

६०६ सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना करावी लागतेय प्रतीक्षा

लाभार्थ्यांची संख्या ९६o

विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या ९६ oएवढी आहे. या शेतकऱ्यांचे एकुण १२ कोटी २५ लाख रुपये ८३ हजार रूपय ६६१ शासनाकडे अडकून पडले आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना

सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, तुती लागवड फळबाग या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. यामध्ये काम पूर्ण झाल्यावरच लाभार्थ्यांना रक्कम दिली जाते. त्यामुळे आधी लाभार्थी जवळचे पैसे खर्च करतात. काम पूर्ण करूनही निधीसाठी प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी लवकरच रक्कम मिळत होती. अलीकडे यात कमालीची अनियमितता आली आहे.

जनावरांच्या गोठ्याचेही पैसे मिळाले नाही

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. तुती लागवडीकरिताही अनुदान मिळते. या रकमाही लाभार्थी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. या योजनेच्या लाभार्थ्यांनाही पंचायत समिती कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. अनेक महिन्यांपासून त्यांचे अनुदान रखडले आहे.

चौकट

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत गेल्या एका वर्षा पासून अनेक गावात व शेतात नरेगा अंतर्गत एकून ९६० कामे पुर्ण झालेली आहेत त्याची रक्कम १२ कोटी २५ लाख ८३ हजार ६६१ रुपये इतके प्रलबित आहेत यावर जिल्हा स्तरावर पाठपुरावा चालु आहे लवकरच निधी उपलब्ध झाल्यावर तात्काळ लाभार्थाच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल

किरण कोळपे
गटविकास अधिकारी उमरखेड

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!