गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांसह प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास.
गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांसह प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास ..
हिमायतनगर : गजानन जिदेवार
हिमायतनगर तालुक्यातील घारापुर दिघी हिमायतनगर येणाऱ्या रस्त्यावरून अर्धापूर तामसा फुलसावंगी एन एच 752 आय हा नॅशनल हायवे रस्ता जात आहे या रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षे उलटले असल्याची तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे टेंभुर्णीच्या नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम केले नसल्यामुळे तेथील शेतकरी यासह प्रवाशांना जीव मुठीत धरून बोटीवरून जीव घेण्या प्रवास करावा लागत असल्याचे त्या ठिकाणच्या प्रवाशांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारने प्रवाशासह नागरिकांची दुर्दशा थांबावी आणि चांगल्या उच्च दर्जाचे रस्ते बनवावे म्हणून वाहतूक उड्डाण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून हा रस्ता होत असलेल्या रस्त्यावर गेल्या तीन वर्षापासून पुलाचे बांधकाम आदरवट असल्याने ईसापुर धरणाचे वक्रद्वारे पेनगंगा नदी पात्रात पाणी सोडल्याने या पाण्याचा फटका येतील शेतकरी व प्रवाशांना बसत असून दळणवळणाचे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे या बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी या रस्त्याचे काम पाहणारे कणिष्ट अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता फोन नोटरीचीबल येत आहे..



