पाणी टंचाई चा प्रश्न समन्वयाने मार्गी लावा – आमदार किसनराव वानखेडे जिजाऊ भवनात पार पडली संभाव्य पाणी टंचाई बैठक

youtube

पाणी टंचाई चा प्रश्न समन्वयाने मार्गी लावा – आमदार किसनराव वानखेडे

जिजाऊ भवनात पार पडली संभाव्य पाणी टंचाई बैठक

उमरखेड:- तालुक्यात नदी काठा लगत च्या गावात, आणि तांडे वाडे या वस्त्या मध्ये संभाव्य पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा टाहो सर्वत्र गावं नागरिकांत वाढला होता आमदार किसनराव वानखेडे यांनी ८ मे गुरुवार रोजी स्थानिक जिजाऊ भवन च्या सभागृहात प्रशासनातील अधिकारी, सरपंच, व ग्रामसेवक यांना आयोजित करून आढावा बैठक घेण्यात आली.

अनेक गावामध्ये ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही त्यामुळे सरपंच ग्रामसेवकां चा समन्वय होत नसल्याने विहीर अधीग्रहण यांचे प्रस्ताव शासना पर्यंत पोहचले नसल्याने संभाव्य पाणी टंचाई निर्माण होण्यास मोठे सढळ कारण समोर आले आहे पाणी टंचाई काळामध्ये निष्कारण पणे काम चुकार पणा करने या महत्वपुर्ण कामा मध्ये बाधा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गटविकास अधिकारी यांनी याबाबतीत सखोल माहिती घेऊन बेजवाबदार कर्मचाऱ्यांचे वेतन कापा असा सज्जड इशारा आमदार किसन वानखेडे यांनी दिला गावं नागरिकांना हे कर्मचारी शासनाकडे निधीचा अभाव असल्याचा बनाव निर्माण करतात या मुळे शासनाची बदनामी करण्याचा प्रकार काही कर्मचारी करीत आहेत आणि नियोजित बैठकीला नेहमीच अनुपस्थित राहतात अश्या कामचुकार कर्मचाऱ्याची कसून चौकशी करावी शासन कार्यामध्ये काम करण्याची इच्छा नसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला पसारा बांधता करावा असे संतापजनक विधान आमदार वानखेडे यांनी पाणी टंचाई बैठकीत केल्याने एकच खळबळ उडाली.
केंद्र सरकारचा हर घर जल ही महत्वकांशी योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळ्या समोर ठेवुन केंद्रसरकारच्या माध्यमातून मुबलक असा निधी या योजनेचा कार्यारंभ करण्यात आला होता काही ठिकाणच्या गावामध्ये संबंधित नियोजन करणाऱ्या अभियांत्याने व महावितरण ने एकमेकांची तांत्रिक अडचण समजुन न घेतल्याने किरकोळ बाबींने ही योजना रखडत पाडली आणि एप्रिल मे या दोन महिण्याच्या कालावधीत अति पाणी टंचाई निर्माण झाली याचा नाहक त्रास संबंधित नागरिकांना सोसावा लागला या बाबतीत सढळ कारण होय जल मिशन अंतर्गत योग्य ती उपाय योजना करावी असे सुचक विधान उपस्थित असलेल्या जलजीवन च्या व महावितरण च्या अधिकारी यांना केले.
पंचायत समिती अंतर्गत संभाव्य पाणी टंचाई निवरणार्थ सन २३ -२४ या मागील वर्षात अधिग्रहण केलेल्या २५ विहिरीचा ठराविक मोबदला प्रशासन स्तरावर विहीर मालकांना न दिल्याने असंतोष उफाळला असुन मोबदल्या पासुन वंचित राहिलेल्या विहीर मालकांनी या वर्षी विहीर अधिग्रहना मध्ये सहभाग ठेवला नाही बहुतांवांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही त्यामुळे दर्जाहीन विकासकामे होतात याचे हे मोठे कारण आहे अकोली, भवानी, निंगनूर, टाकळी (इसापूर ), मुरली, जेवली, सोईट (महागांव ), बोथा (वन ), बिटरगाव (बु ), दिघडी, या ठिकाणच्या विहिरी आटल्या व पाडलेले बोअर पाण्या अभावी निकामी झाले निंगनूर, भवानी या ठिकाणच्या गावालागत गाव वाड्यांची संख्या नऊ वरून अधिक असल्याने सर्वाधिक पाण्याचा गंभीर प्रश्न उदभावला असल्याने व अधिग्रहणाच्या विहिरी दुर अंतरावर असल्याने या गावांना टँकर ने पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्या गावच्या सरपंचांनी उपस्थित केला मुरली येथील सरपंचांनी पैनगंगा नदी पत्रात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचावे अशी मागणी केली.
पाणी टंचाई आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर, गटविकास अधिकारी किरण कोळपे, जिल्हा समन्व्यक नितीन भुतडा, जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता गुलाब घेवंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंजाब रणमले, जल जिवन मिशन चे अभियंता सौरभ सोनी, ऊर्ध व पैनगंगा प्रकल्प चे अभियंता व महावितरण चे अधिकारी उपस्थित होते

सोबत –
आढावा बैठकीचा फोटो जोडला

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!